कधी र्हस्व माझाच मी दीर्घतो
Posted by अजय अनंत जोशी on Tuesday, 23 February 2010कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी र्हस्व माझाच मी दीर्घतो
तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो
लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?
दिसे हे रक्त साध्या माणसांचे
( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )
गझल
कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी र्हस्व माझाच मी दीर्घतो
तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो
लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?
वागतो आहोत वादळ पूर्ण शमल्यासारखे
भासतो आहोत आपण छान रमल्यासारखे
भांडणे डोळ्यांमधे येतात लाटांसारखी
ओठ भासवतात पण सागर नरमल्यासारखे
एकमेकांच्याविना ताजेतवाने एरवी
पाहुनी तुला खुलेल ही कळी
चेह-यावरी पडेलही खळी
आज ये निवांत भेटण्यास तू
आज मी घरी बरीच मोकळी
ये नि फक्त स्पर्श कर जरा मला
आभास मीलनाचा..
केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहतांना हळुवार लाजली तू
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला
आठवण म्हणुनी मिळाला एक छल्ला
आणि ’विसरावे’ असा जोडीस सल्ला
अर्थ ’नाही’चा अता ’नाही’च आहे
मारला आहेस तू भलताच पल्ला
माणसांना देव खपवावा जरासा
देवळामध्ये कसा निर्धास्त गल्ला
व्यथा
जितके जमेल तितके अडवीन मी व्यथांना
नाहीच ऐकले तर बडवीन मी व्यथांना
केला प्रयास जर का त्यांनी लढावयचा...
नक्की क्षणाक्षणाला रडवीन मी व्यथांना
खोटे असते हळहळणे
खरे आतले मळमळणे
कधीच मी सोडून दिले
तुझ्यावाचुनी तळमळणे
सहन कसे मी करू प्रिये..
फुकट कुणाचे सळसळणे ?
मीठ असो किंवा साखर
दुधात असते विरघळणे
बातमी तशी खोटी, पण...
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे वाढे कधी अंतर कधी लाटा