गझल

गझल

रांगले होते

शिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते

सुख पाण्या पोराने नातेही लांघले होते
थकलेल्या बापाने जीवाला सांडले होते

गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते

गझल: 

कवी

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू

गझल: 

बोलणे माझे ...

बोलणे माझे निखार्‍यातून आहे
सावली तितकीच हृदयातून आहे

भाग्य मिळवायास आहे फार सोपे
फक्त तिथला मार्ग काट्यातून आहे

घेतली आहे कुठे मी आजसुद्धा..?
ही नशा माझ्याच जगण्यातून आहे

गझल: 

गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही

गप्प नसती लोक काही नेमके पाहूनही
शोधती खोली जळाची ते दगड टाकूनही..

तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते परंतू एवढे सोसूनही

वादळाची एवढी का वाटते भीती तुला

गझल: 

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

गझल: 

..... पुन्हा पुन्हा !

दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना

गझल: 

मी क्धी ना अड्वले

घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले

मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले

पूल ना भिंती बांधल्या तू कशाला?
माज ते सारे, मी कधी ना अडवले

गझल: 

हात माझे फुलांनी ही पोळले होते.....

हात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....

रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?

गझल: 

Pages