आता जरा मी लबाड झालो
Posted by कैलास गांधी on Monday, 19 July 2010जरी उभा चांदण्यात आहे
तरी उन्हाळा उरात आहे
लग्न मोडते ज्याचे नेहमी
त्याच्या दारी वरात आहे
सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे
स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी ?
सोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता !
गझल
जरी उभा चांदण्यात आहे
तरी उन्हाळा उरात आहे
लग्न मोडते ज्याचे नेहमी
त्याच्या दारी वरात आहे
सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे
स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे
संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची
सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची
चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची
आरसा पाहायचा राहून गेला
चेहरा निरखायचा राहून गेला
यायची वचने फक्त मजला मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला
मी कधीना पालखी कवितेस केली
शब्द हा मिरवायचा राहून गेला
रात्र होती..पावसाचा नाद होता..
शांतता होती..तुझा पडसाद होता!
चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्यासाठीच का हा वाद होता??
वेल होती, एक वेडे फूल होते...
बाग माझाही कधी आबाद होता!
माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला काही असे असावे
पंचांग म्हणत होते की आजची अमावस
येता समोर तू कां मग चांदणे पडावे?
आडून चौकशी कां होते तुझ्याकडूनी?
कोणत्या चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू
तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू
गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू
पटवती साऱ्या पुरातन ओळखी
प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे
परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे
लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
कर्जमाफिच्या आमीशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाहि तरीही पीक भुकेचे येते
कुपोषणाचा अर्थ कळाया उपोषणाला बसली
मातीच्या गर्भात अकाली जन्म जाहली शेते
किती गचकली पाण्यावाचून गणती कोणी केली