'' शेवटी ''
Posted by कैलास on Saturday, 31 July 2010वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी
हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी
लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
उजाड हा माळ अन् इथेही मला तुझ्या भेटतात हाका...
अजून रेंगाळतो तुझा हा सुगंध माझ्या सभोवताली
गझल
वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी
हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी
लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
माझ्या मनात थोडे सांडून चांदणे
गेले कुणीतरी हे देऊन चांदणे
जेव्हा पुन्हा नव्याने उगवेल चंद्र तो
घेईन मी नव्याने वेचून चांदणे
करतो विचार आहे केवळ तुझाच मी
आहे जणू मला ते वेढून चांदणे
ती स्वप्नसुंदरी
सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
ते चित्र पाहतांना दिसते समानता(?)
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
जोडे सजावटीला एसी-कपाट ते
टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही
घे, तुला सारेच माझे मोकळे घर..
पण मला ठेवायची आहे नशाही
काळजी घेतो जशी माझ्या मुलीची
अन् तशी सांभाळतो मी वेदनाही
............................
प्रदेश...
............................
द्यायचा किती स्वतःस त्रास आणखी ?
व्हायचे कसे, किती उदास आणखी ?
एवढ्यात थांबली कशी तुझी कथा ?
कधी स्वतःच्या जगण्यालाही विटलो
कधी अचानक श्वास कुणाचा ठरलो
किती, काय अन् कशाकशाचे सांगू...
कुणाकुणासाठी मी दाने हरलो
कुठे माहिती होते छक्के-पंजे ?
मी तर सर्वांना आपला समजलो
गोचिडांची मौजमस्ती
.
चौखूर उधळे दाहीदिशा, गवसणी मग घालणार कशी?
नसते नाकही या मनाला, वेसण तरी टोचणार कशी?
खूप करती निश्चय-इरादे, मुक्त होण्यास जोखडातुनी
मी वेड्यांच्या जत्रेमध्ये लावुन बसलो पाल
बघता बघता खपलो मी अन वाया गेला माल
मी रागाला गेल्यावरती तिने चुंबिला गाल
इतक्या कच्च्या वैर्यासाठी इतकी सुंदर ढाल?