...व्यवसाय मी
Posted by अनिल रत्नाकर on Sunday, 9 October 2011 पापाकडे खेचलो गेलो काय मी?
आयुष्य ऊगा खुरटले बोन्साय मी ।
सैतान जागाच झाला माझ्यातला
हा मांडला भावनांचा व्यवसाय मी
लाथाडले नेहमी त्यांनी ते मला
त्या पायरीशी कसे नेले पाय मी?
जरी तो चेहरा आता दिसेना,
मनाचा कापतो पारा कितीदा !
गझल
पापाकडे खेचलो गेलो काय मी?
आयुष्य ऊगा खुरटले बोन्साय मी ।
सैतान जागाच झाला माझ्यातला
हा मांडला भावनांचा व्यवसाय मी
लाथाडले नेहमी त्यांनी ते मला
त्या पायरीशी कसे नेले पाय मी?
कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव
या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव
बत्तीस तारखेला
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
हुंदका ओठातला पोटात नाही
प्रेम व्यवहारातले, सत्यात नाही
मोजता खोली विचारांची कळाले
बोलतो नुसतेच, आचारात नाही
हिरकणीइतकीच फरपट रोज होते..
फक्त अमुचा लेख अभ्यासात नाही
अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो
कोंडून आसवांना डोळ्यात सरावाने
चिक्कार सहन केले आघात सरावाने
जमलेच गणित नाही,जगण्याचे मरण्याचे
मरतोय रोज थोडा,जगण्यात सरावाने
आयुष्य कंठल्यावर्,झोपडपट्टीमध्ये
मी वावरेन म्हणतो,नरकात सरावाने
मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे
वेगळे केले स्वतःचे विश्व ज्यांनी छानसे...
कोरडया होतात भेटी ओल नाही कालची
फक्त देखाव्यास उरले चेहर्यावरचे हसे...
रोज होतो घात माझा रोजचे आघात हे