मजकूर
Posted by आनंदयात्री on Sunday, 22 May 2011विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
गझल
विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
गावाला आलो की मिळते सावळ कांती गालाला
चुंबन देते बहुदा काळी माती गोर्या पोराला
म्हातारा झाल्याने बाबा बोलत नाही मोठ्याने
पण थकलेल्या वाणीचाही धाकच आहे आम्हाला
लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा
का असा खुळ्यापरी तुलाच रोज पाहतो
पाहतो मलाच मी जरा जरा जरा जरा
सांग काय टाळतात गूज ओठ बोलके
तू जशी तसाच मी जरा जरा जरा जरा
बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू
ठेवली आहेत जी अस्पर्श स्वप्ने
ती घडी केव्हातरी मोडून पाहू
मीच लिहिलेला ‘खरा’ इतिहास आहे
कोणत्या रंगामधे बुडवून पाहू ?
टांगला जेव्हा वडाला जन्म देवा...
आत्महत्येला मिळाला जन्म देवा...
मी कसे उत्तर तुझ्या प्रश्नास देऊ...
सांग कोणाला कळाला जन्म देवा...?
मुर्त झाली पेटण्याने आग किंतू...
उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!
.
परजून आठवांना....
करतात वार भिंती !!
आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!
गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!
सोसून पावसाळे...
संयमाचे लाड केले फार त्यांनी...
अन् फुलांशी टाळला शृंगार त्यांनी...
जे प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...
काळजी आता भविष्याची कशाला...
========================
आयुष्याला कुठल्याही द्रावाने भरणे आवश्यक
दु:खाइतके नाही आता दु:ख विसरणे आवश्यक
कुठल्या कुठल्या संदर्भांना जडला आहे गंध तुझा
जगता जगता काही श्वासांचे गुदमरणे आवश्यक