गझल

गझल

~ शामकांती सांजवेळी ~

शामकांती सांजवेळी, चांदणे माळीत जावे
शारदाच्या यौवनाला, रे दिला टाळीत जावे
..

ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे
..

गझल: 

उठ बा रे पांडुरंगा..

संत नाही राहिले ते, राहिले ना भाट आता
उठ बा रे पांडुरंगा दाखवाया वाट आता ..

पेरल्या नोटेस त्यांच्या पीक येते बहुमतांचे
लोकशाहीचा असा बाजार हा सरलाट आता..

सांगतो हा सातबारा आत्महत्येची कहाणी

गझल: 

बदनाम..

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे

गझल: 

पाणी थकले, जमीन थकली...

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

गझल: 

''भारतीय''

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,

गझल: 

मी तसा माणूस आहे

याचनेत बनाव माझ्या
अंतरी पण हाव माझ्या

जखम भरली, पण मनावर
खोल झाला घाव माझ्या

आत हरलो, चेहर्‍यावर
जिंकल्याचा भाव माझ्या

नेभळट मी! धाडसाची
काय चर्चा राव माझ्या?

गझल: 

बहरता बहरता.....

पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे

तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे

गझल: 

कळले नाही

फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!

गझल: 

Pages