''वादात या कुणीही सहसा पडू नये ''
Posted by कैलास on Saturday, 19 February 2011हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये?
उठसूठ मुख्यमंत्री दिसतात मंदिरी
मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
गझल
हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये?
उठसूठ मुख्यमंत्री दिसतात मंदिरी
भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ नको
मी कघी येणार नाही वाट तू पाहू नको
एकटा माणूस आला .एकटा जाणारही
माहिती आहे तुला तू सोबती होऊ नको
शांत मी माझ्या घरी झोपेन त्यावेळी तरी
ती बातमीच दाटली घशाशी
गर्दीच कोण साठली घराशी!
नाही मला अता जगावयाचे
भांडेच आज सावली जगाशी
का ढवळता निवांत त्या तवंगा
ईच्छा तळात नाचली मघाशी
गेले गळून आप्त पान कसे?
जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला
हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला
मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते हसे
चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची
ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची
बोल केव्हातरी मुक्त वार्यापरी
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
काळोख जो जगाचा, माझी प्रभात आहे
आताच मैफलीचा मी वर्ज्य सूर झालो
माझ्याशिवाय गाणे तालासुरात आहे
गेलो निघून डोळे ठेवून कोरडे मी
माझ्याच आसवांचे पाणी घनात आहे
तुझा दोष नाही, तुझी चूक नाही
जळाने शमावी अशी भूक नाही
कसे धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही
लिलावी स्वतःलाच मांडेन म्हणतो
मला मोल माझेच ठाऊक नाही
नवीन रस्ते बघून बसली ,कोठे दडून स्वप्ने
उगाच आशा नव्यानव्याची, होती धरून स्वप्ने...
कधी कुठे झगमगाट दिसला, केला कुणी इशारा...
तुझीच फसली कशी कळेना ,डोळे दिपून स्वप्ने