अजिंक्य!
Posted by निलेश on Friday, 27 April 2007मेघावरी उडण्यास उत्तुंग झेप घेतली,
मग नभातरे ममपंख कापविले कोणी?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी...
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
गझल
मेघावरी उडण्यास उत्तुंग झेप घेतली,
मग नभातरे ममपंख कापविले कोणी?
आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती
ऐक डोळेच माझे अता
मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा
आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही
उत्सव कशाचे साजरे झाले
वातावरण तर बोचरे झाले
चौकात रहदारी सुकर झाली
सिग्नल बसवला ते बरे झाले
अभ्यास काही काळिजे आता
पुष्कळ तर्हांचे चेहरे झाले
काही समुद्रांच्या नद्या झाल्या
काही नद्यांचेही झरे झाले
कोणास केले अलविदा आपण
की हात इतके कापरे झाले
-विजय दिनकर पाटील
खूप बोलू लागला अंधार नंतर
नीज आली पण पहाटे चार नंतर
वेल जाईची पुन्हा फुलणार माझी
सांज अवघी लालसर होणार नंतर
पैठणीच्या रेशमाचे काय झाले
घेतली कोणी विकत जरतार नंतर
खूप आधी मी तुझ्यावर प्रेम केले
हा तुझ्यामाझ्यातला व्यवहार नंतर
राग आला ह्याच गोष्टीचा अचानक
चीड आली खूप तपशिलवार नंतर
काय तू आहे असे केलेस पूर्वी ?
काय तू आहेस रे करणार नंतर ?
आंधळा होतास तू संपूर्ण आधी
आणि मग... झालास बहिरा ठार नंतर
खूप तो आहे तसा सहृदय कसाई
कळवळा येईल त्याला फार नंतर