गझल

गझल

कालचा पाऊस

भेटला पाऊस अन् भिजवून गेला
स्पर्श ओले मन्मनी ठेऊन गेला

आठवांनी जीव कासावीस व्हावा
कोणता हा मेघ ओसंडून गेला?

मोडल्या घरट्यास आता जाग आली
गाव स्वप्नांचा इथे राहून गेला

गझल: 

जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे

नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा सांडणे बरे नव्हे
जळात राहुन माशासोबत असे भांडणे बरे नव्हे

विटाळ ज्याचा लवण तयाचे चविष्ट ना लागते इथे
कशास चर्चा,तू तर आता मतहि मांडणे बरे नव्हे

गझल: 

तिजोरी

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला भिकारी

करा साजरे सोहळे प्राक्तनाचे
दिवे लावतो घेउनी मी उधारी

तशी मोजकी आसवे 'एकटया' ची
उशाशी सकाळी मुकी वाटणारी

ज़रा चाखली वर्तमानात आशा

गझल: 

अपघात काय घडला?

रिमझिम सुरात धारा अवघा मळा बहरला
बांधावरी उतरल्या माझ्या अनंत गझला

पाण्यात त्राण नाही विरले कधीच भवरे
हळव्या नदीत सांगा अपघात काय घडला?

आई किती मयेची सार्‍याच लेकरांची

गझल: 

होतीस तू

माझिया प्रेमात राणी,गात होतीस तू
भारलेली ही सुगंधी, रात होतीस तू

वाट वेडी, दाट झाडी, साथ होतीस तू
स्पर्श होतो चोरटा, लाडात होतीस तू

पेटती विझले निखारे, आसवांनी जणू

गझल: 

ना ते

ह्या जगाशी ना जुळले नाते
ऊंच आकाशी रुळले ना ते

कष्ट मोठे पण यश ते आले
शेवटाला गाभुळले नाते

हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते

संशयाचे बी रुजले होते
दु:ख झाले हुळहुळले नाते

गझल: 

किमया

..............................................
किमया
..............................................

एकरूप माझ्याशी व्हावे उदकाने !
आस कोरडी बाळगली ही खडकाने !

गझल: 

मी जरा बोलायला गेलो कुठे

वाटले मजला जरी साधेच हे
भोवती होते कठीणच पेच हे

ऐकताना का कुणी गुंगू नये?
बोलणे आहे तुझे दिलखेच हे

घेतलाना आरशाचा गुण कुणी
माणसाला माणसांचे पेच हे

गझल: 

Pages