अंतराय
Posted by ज्ञानेश. on Tuesday, 14 April 2009=====================
गझल:
कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ?
अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !
गझल
=====================
जा मुक्त तू साऱया जुन्या शपथातुनी
जा मुक्त तू साऱ्या नव्या वचनातुनी
मनास वाटे कसे जगावे तुझ्याविना
तरी उठवतेच फायदे हे तुझ्याविना
लांबसडक तुझिया वेणीचा नाजुक फास असा लागावा...
पूर आले ,सोसली मी वादळेही ,वाढलो मी
घाव भरले, पण फळांचा भार झाला वाकलो मी
या जगाच्या कौतुकाने केवढा आनंदलो मी
चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..
हृदयांस तुझ्या रे नको बदलवू आता
बदलून जगाला नको बिघडवू आता
बहरासंगे फुलणार्या सर्व फुलांची मी कोण लागते
ती पायदळी जाऊ नयेत एवढेसेच तरी मागते
नकोच असतो विचार ज्याचा, नकोच असते गाठभेठही
सुरू असतात दिखाव्याला त्या शत्रूची कशी स्वागते