गझलविषयक लेख

भटसाहेबांच्या सहवासात...

''हे बघा, कुर्कल्णी...प्रदीप ना तुमचं नाव? आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं. ('कधीही' हा शब्द उच्चारताना उजव्या हाताची तर्जनी त्यांनी मूठ स्थिर ठेवत अशा काही आग्रही पद्धतीनं हलवली, की तो मुद्दा माझ्या मनात त्या मुठीसारखाच स्थिर झाला. पुन्हा "राहवत नाही' हे शब्द ठाशीवपणे उच्चारल्यानंतर 'म्हणून' शब्द उच्चारताना तीच तर्जनी त्यांनी जमिनीच्या दिशेनं अशा वेगानं नेली, की तोही मुद्दा माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला). नाव व्हावं म्हणून लिहिणारेही असतात; पण ते चमकतात, चमकतात आणि विझून जातात. गझल मनापासून आवडली, तरच तिच्या वाटेला जा. गझल मनापासून आवडत नसेल आणि नावासाठी तिच्याकडं वळला असाल, तर ही वाट सोडून आत्ताच वेगळी वाट धरा. आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. साधना-सिद्धी-प्रसिद्धी. आधी साधना...मग साहजिकच सिद्धी...आणि सिद्धीनंतर आपोआपच प्रसिद्धी. प्रसिद्धीसाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.''

आपले रडणे....एक रसग्रहण

मित्रहो, वैभव देशमुख यांची आपले रडणे सृजन आहे जणू ही गझल सकाळ वृत्तपत्राच्या १८ मे २०१४ च्या सप्तरंग पुरवणीत प्रसिध्द झाली. तिचे हे अल्पमतीनुसार केलेले रसग्रहण.

शेरो-शायरी : प्रस्तावना

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे.

अनंतची गझल

उर्दूतली तरलता, हिंदीच्या दुष्यंतकुमाराची सरलता आणि आपल्या गझलेला असलेला आपला स्वतःचा चेहरा हे अनंतच्या गझलेची वैशिष्ट्ये आहेत... ... ती संयतही आहे आणि हळूच भाष्य करणारीही. समाज, प्रेम, दुःख, उत्सव साऱ्यांनी ती युक्त आहे.

ज्योत छोटीशी जरी.. रसग्रहण

मित्रहो, वैभव देशमुख यांच्या ज्योत छोटीशी जरी...या आणखी एका गझलेचे रसग्रहण सादर करीत आहे.

पहा ग़ालिब काय म्हणतो

"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --

बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल
कुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए

शे(अ)रो-शायरी, भाग-९ : टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या

परवीन शाकिर म्हणजे पुरुष-प्रधान संस्कृतीच्या विरोधात आपला आवाज नेहमीच बुलंद करणारी एक बंडखोर,आणि प्रखर स्त्री-मुक्तिवादी पाकिस्तानी कवियत्री! सगळी बंधने, मर्यादा, नीती-नियम फक्त स्त्रियांसाठीच का?- हा प्रश्न परवीन भोवतालच्या पुरुष-प्रधान समाजाला नेहमीच ठणकावून विचारायची. स्त्रियांवरील अन्यायाची परिसीमा गाठणाऱ्या पुरूष-प्रधान रुढी, आणि तितक्याच सडक्या व गळक्या परंपरा ह्यांचा परवीनने नेहमीच कडाडून विरोध केला. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला; पाकिस्तानी समाजाच्या प्रखर टीकेचे ती लक्ष्य बनली, पण तरीही निडर परवीनने कधीही शरणागती पत्करली नाही.

Pages