मी तसा माणूस आहे
Posted by विजय दि. पाटील on Thursday, 30 September 2010
याचनेत बनाव माझ्या
अंतरी पण हाव माझ्या
जखम भरली, पण मनावर
खोल झाला घाव माझ्या
आत हरलो, चेहर्यावर
जिंकल्याचा भाव माझ्या
नेभळट मी! धाडसाची
काय चर्चा राव माझ्या?
देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढसुद्धा आगलावे !
याचनेत बनाव माझ्या
अंतरी पण हाव माझ्या
जखम भरली, पण मनावर
खोल झाला घाव माझ्या
आत हरलो, चेहर्यावर
जिंकल्याचा भाव माझ्या
नेभळट मी! धाडसाची
काय चर्चा राव माझ्या?
पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे
एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे
तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे
फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही
अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही
गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची
स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची
सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमध्ये आसवे भिजायची
हिशेबाची माय मेली?
कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?
पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?
तिला घाबरावे असे काय आहे
कुणाचा भास होतो
जरासा त्रास होतो
तुझ्या रानात माझा
बरा वनवास होतो
जशी तू देव होते
तशी आरास होतो
रुपेरी पैंजणांचा
रुपेरी फास होतो
तुझ्याशी भांडतो पण
मलाही त्रास होतो
सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!
तेजाळल्या दिव्याच्या वातीस हे विचारा..
हे अग्निदिव्य करण्या, ती का जळून आली?
हा संपणार नाही रस्ता कधी व्यथेचा..
कसा मी करावा खुलासा मनाचा
कुठे भरवसा आज आहे कुणाचा
भला हा जमाना भली माणसे ही
भला डाव आहे भुरळ पाडण्याचा
जरा लाभता मज इथे सौख्य साधे
जगा दु:ख आहे तया टाळल्याचा