शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?

का सदा माझ्यापुढे ही संकटे 'आ' वासलेली?
काळ आहे माजला की जिंदगी सोकावलेली?

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू?
बोलता आलीच नाही गोष्ट मनि आकारलेली

मुक्त मी व्हावे म्हणोनी आणला आवेश अंगी

गझल: 

फडफडतो काळजात माझ्या...

फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

गझल: 

देवुनी तुझे तुला निघायचे मला..

देवुनी तुझे तुला निघायचे मला
वेगळे तुझ्याविना जगायचे मला..

रावणापरी तुझे कुकर्म पाहिले
चेहरे तुला किती?बघायचे मला..

झेप घ्यायचो पुन्हा पडायचोच मी
लोक आपलेच हे नडायचे मला..

गझल: 

~ शामकांती सांजवेळी ~

शामकांती सांजवेळी, चांदणे माळीत जावे
शारदाच्या यौवनाला, रे दिला टाळीत जावे
..

ना भरोसा चांदराती, भाळलेल्या त्या क्षणांचा
सज्जनांनी सज्जनांचे, वायदे पाळीत जावे
..

गझल: 

उठ बा रे पांडुरंगा..

संत नाही राहिले ते, राहिले ना भाट आता
उठ बा रे पांडुरंगा दाखवाया वाट आता ..

पेरल्या नोटेस त्यांच्या पीक येते बहुमतांचे
लोकशाहीचा असा बाजार हा सरलाट आता..

सांगतो हा सातबारा आत्महत्येची कहाणी

गझल: 

बदनाम..

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे

गझल: 

पाणी थकले, जमीन थकली...

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

गझल: 

''भारतीय''

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि राव येथे
शोधुनीही सापडेना भारताचे नाव येथे

मी मराठी,तो बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर प्रदेशी,रंगलेला डाव येथे

घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे निर्लज्ज नेते,

गझल: 

Pages