उसवित बसले बूड कवी हे ज्या झोळ्यांचे

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे

लाकुड तोड्याने सोने लाथाडुन जावे,
इतके का गरजेचे खपणे त्या मोळ्यांचे?

बंक्यासाठी ज्ञान्याने भरलेल्या तेव्हा

गझल: 

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये
त्या क्षणी हृदय तुला मी वाहिले प्रिये

दु:ख ते कुठे कधी मला न लाभले

गझल: 

ऐकत नाही आता हे मन...

ऐकत नाही आता हे मन
रात्रंदिन केवळ आक्रंदन

कधीतरी मग संयम सुटतो
अवेळीच होते उद्दीपन

भूक लागते शरीरास, मग
कसली सीमा? कसले बंधन?

झाले बघ दोघेही मोठे
परस्परांचे करुनी खंडन!

गझल: 

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

जुन्याच घटना कुणी कधीचे ,इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे ,कधी तरी का घडले आहे?

तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...

गझल: 

नव्हतो

मी कधीही पेटलेली आग नव्हतो
मी कधीही बहरलेली बाग नव्हतो

भूक होती, झोप होती, श्वास होते
मीच देहाचा कधीही भाग नव्हतो

कोण होतो ते मला कळलेच नाही
कमळ नव्हतो, फणस नव्हतो, साग नव्हतो

गझल: 

तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे

मी भले राहिलो ऊष्ण ऊन्हामध्ये
तुजवरी हरघडी सावली पाहिजे

गझल: 

दु:ख माझे सोबती !

दु:ख माझे सोबती !

तू बिलोरी वेदनांची लालसा आहे !
मी नकोशा चेहर्‍यांचा आरसा आहे !

सज्जनांना लाभलाहो न्याय हा अंती
मी भिकारी लक्तरांचा वारसा आहे !

पुंडलीका वीट देवा तू नको मांडू

गझल: 

हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

कृष्णधवल गोपिका पहाण्याचा गोडवा
हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

भाळावर घामाच्या चमचमत्या चांदण्या
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा गोडवा

जांभळाच्या चविलाही आलाय साजणी

गझल: 

Pages