जीवन तेंव्हा भिजत राहते
Posted by स्नेहदर्शन on Friday, 14 May 2010माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते
माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते
जखमांनाही किती वेदना होत असावी ?
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?
माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते
माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते
जखमांनाही किती वेदना होत असावी ?
कातरवेळी दाटुन येते जुनाट मरगळ
जुन्या वहीतुन सुटतो जेव्हा तरणा दरवळ
पाकळीत त्या निरोप तर जिरला नाही ना?
पिकलेल्या काळजास लागे हिरवी कळकळ
मला वाटले सुकून गेले दव गालीचे
संस्कारांची लावन करते माझी आई
देवांचे संगोपन करते माझी आई
दु:खाच्या डोहाला बाबा घाबरताना
जगण्याचे आंदोलन करते माझी आई
घरट्यावरती आभाळाचा होतो हमला
पदराचा गोवर्धन करते माझी आई
नाचवू नका फुलपाखरे
राबवू नका फुलपाखरे
झोप साखरी त्यांची असे
जागवू नका फुलपाखरे
पंख कापरी तुटतील ते
गाजवू नका फुलपाखरे
राहू दे जिथे हसतील ती
थांबवू नका फुलपाखरे
सत्य आयुष्या अता पचवायला हवे
सख्य माझ्याशी तुला जमवायला हवे
ऊठ आता जाग तू निद्रिस्त भारता
स्वप्न मरणासन्न हे जगवायला हवे
चांदण्यांचे दागिने मोडीत काढुनी
मी तुला अन तू मला मिरवायला हवे
असा कसा मोहरुन गेलो,तुला पहाता हरून गेलो
कधी न होतो जरी कुणाचा,तुझाच आता ठरून गेलो
न काहि येता कसे जगावे,इथेच सारे कळून गेले
जरी न पोहावयास येते,हरेक सागर तरून गेलो
कधी वाटते मी भिडावे जगाशी
कधी वाटते मी भिडावे जगाशी, '' कशाला फुकाचेच ''? वाटे कधी
कधी मी निवडतो सरळसोट रस्ता,उगा फोडतो कैक फाटे कधी
वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..
मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!
जे मनाला वाटते, पटते तसे बोलून टाके,