दूरचा किनारा
Posted by योगेश्वर रच्चा on Monday, 24 May 2010करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले
भर श्रावणात जेव्हा दुष्काळ पाहिला मी
या भूतलास माझ्या अश्रूंत मी भिजवले
येणार ना कधीही माझा वसंत आता
मी कुठे होतो शहाणा ? मी कुठे होतो हिशेबी ?
मी जरी बेरीज केली ती वजाबाकीच होती !
करण्यास पार क्षितिजे पाउल मी उचलले
रस्ते निघून गेले, मागे मला विसरले
भर श्रावणात जेव्हा दुष्काळ पाहिला मी
या भूतलास माझ्या अश्रूंत मी भिजवले
येणार ना कधीही माझा वसंत आता
किती आले किती गेले महाज्ञानी तुकारामा..
कुणीही पोचला नाही तुझ्या स्थानी तुकारामा..
जरी हे लाभले आम्हा विचारांचे करंटेपण..
करी श्रीमंत जगण्याला तुझी वाणी तुकारामा..
काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...
दूध नावास मी राहिलेलो...
काढली एवढी साय त्यांनी...
वाढवुन आपल्यातील गुंता...
मोकळा मार्ग केलाय त्यांनी...
काठभरल्या घागरीतुन गाळलेल्या वेदना
नाचल्या माहेरभर सांभाळलेल्या वेदना
पीठ आहे अडकुनी जात्यात आरीभर जरी
पाखरे खाऊन गेली चाळलेल्या वेदना
तीच ती भांडी घरी आहेत तुटकी आजही
'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे
शिक्षाच शेकडोंनी ठोठावतील सारे
उल्लेख आपले तू वेळीच टाळ आता
येताच नाव माझे भंडावतील सारे
आडून ओढणीच्या उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील सारे
सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.
हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.
लोकहिताच्या सर्व योजना खाउन टाका
का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?
कोणीतरी रोज कसली ही युक्ती लढवत असते..
श्रींमंत श्रींमंत होतात नि गरिबी वाढत असते!
तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
दंगली पाहूनही मेलीत काही माणसे
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे
केवढी ती प्रीत काळी आंधळे काळीज ते
नाचली काळीज ते पेलीत काही माणसे
उंच राही देव आणी अंतही आहे मधे