आयुष्य खूप गेले,
Posted by जयन्ता५२ on Sunday, 18 October 2009आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
आडून आसवांच्या थोडा हसेन म्हणतो
शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो
सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
आडून आसवांच्या थोडा हसेन म्हणतो
शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो
सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आता नवे जगायाच्या उमेदी आणू कशाला?
आता नवे भोगायचे शाप मी मागु कशाला?
आता नवे सोसायची नाही तयारी मनाची,
आता नव्याने स्वतःला मी आजमावू कशाला?
तेव्हाच माझ्या भावनेला साद ना आली तुझी,
काय सुनसान पोकळी आहे
की मनालाच काजळी आहे?
कालची भांडणे बरी होती
शांतता आज वादळी आहे
वादळे मीच आणतो आहे
त्यात माझीच पाकळी आहे
'जिंकणे, हारल्याविना काही'
कल्पना खूप आगळी आहे
उरात आता नवा भाव आहे
सुखास आता तुझे नाव आहे
दिलास या तूच चोरून नेले
दिसायला तू जरी साव आहे
उगाच पत्ते बघू मी कशाला?
तुझ्याच हाती दिला डाव आहे
'लिना' घरी हाय! - पाटी 'रिना'ची
मी असाच धावणार...थांबवू नको मला!
जाहला उशीर फार...थांबवू नको मला!
धूप दीप देव सर्व तू तुझे पहा अता
मी न हे जुमानणार...थांबवू नको मला!
एकमेव हा उपाय शेत नांगरायला..
पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते
पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते
जमिनीमध्ये रूजणारी बी त्या झाडाचे भाग्य जाणते
स्वस्त बिडीचे थोटुकसुद्धा फेकुन देण्याइतका
नसेल पैसा एक दिवस देशीही घेण्याइतका
उपभोगांची कमाल मर्यादा नोंदवली... आता
निलाजरा झालो आहे खजुराहो लेण्याइतका
धुंदीमध्ये आठवणींची हकालपट्टी केली
बिनधास्त नाते आपले चालेल तोवर चालु दे !
केंव्हातरी दिन आपला संपेल तोवर चालु दे !
'मी मारल्या हाका तरी नाही कुठे दिसलीस तू...,
गेलो घरी !' ही थाप ती मानेल तोवर चालु दे !