कशी वेळ आली? : डॉ. श्रीकृष्ण राऊत
कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली!
हसे आज कुंकू;
गमावून लाली.
करा बंद वर्षा;
पिके तर जळाली.
बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.
बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली.
खुनी देव झाले;
पुजारी मवाली!
(`गुलाल आणि इतर गझला'संग्रहातून)
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली!
हसे आज कुंकू;
गमावून लाली.
करा बंद वर्षा;
पिके तर जळाली.
बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.
बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली.
खुनी देव झाले;
पुजारी मवाली!
(`गुलाल आणि इतर गझला'संग्रहातून)
जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी
गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन
वाहियले तुजसाठी मी... जीवन
जगण्याचा अर्थ खरा लावलास
प्रतिभेचे फुलविलेस.. नंदनवन
घेवुन सल काळजात मी फिरतो
अन माझ्या दु:खाचे.. तू सांत्वन
तेज असे तुझियातच.. विश्वाचे
तार्यासम झळके माझे प्राक्तन
शालिनता आणलीस जीवनात
नम्र किती झाले... माझे वर्तन
हा प्रभाव माझ्यावर गझलेचा
फक्त तिचे बोल ऐकते हे मन
ही सदैव जीवनात हेळसांड
गझल करी मातेसम संगोपन
गुलाम केले आम्हाला... हे मालक झाले
गनीम रयतेच्या राज्याचे शासक झाले
विकास अमुच्या दारी सांगा आला का हो ?
हजारवेळा निवडणुकींचे... नाटक झाले
गरीब हटले, हटली नाही अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले
पहा पुन्हा या टोळ्या आल्या, लुटले आम्हा
लुटीत... तारणहार, ठग्यांचे हस्तक झाले
कमावता येते धन, येथे... कर घोटाळे
इमानदारीने जगले, ते... हल्लक झाले
आज फुलांची भाषा.....
आज फुलांची भाषा मजला कळते आहे
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे
उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे
एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
* राहिले रे अजून श्वास किती ?
जीवनाची कथा उदास किती
दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती
चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती
गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
सूर माझ्यामधून... दूर अता...
आळवू मी तरी सुखास किती ?
ना ठावुक तुजला कितीक कळतो आहे
जो दाह तुझा मज अविरत छळतो आहे
चालली जणू ही... माझी अग्निपरीक्षा
मी काय सिद्ध करण्याला जळतो आहे
तू समजुन घे ना.. माझ्याही शब्दांना
जे तुला वाटती... उगा बरळतो आहे
थांबवू कसा हा.. आठवणींचा ओघळ
जो डोळ्यांमधुनी घळघळ गळतो आहे
हा अथांग सागर माझे इप्सित असुनी
मी उगाच... काठावर डुचमळतो आहे
घे छळुन.. प्राक्तना, हवे तेवढे आता
पाहू दे, मला तू किती उधळतो आहे
जे कधी न जमले मजला
जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !
मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !
त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !
तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !
एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,