पाहिले वळून मला
कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला
सुरेश भटांची मला आवडलेली रचना:
प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो,
प्रत्येक वेळी आणतो ओठांवरी हासू नवे!
कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला
हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही
उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे
सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-
"मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना!"
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात
मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!