मरणानंतर
Posted by अनिल रत्नाकर on Sunday, 3 January 2010
ताटवा भोवतीला तो फुलांचा
आडवा देह झाला तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
काळ हा सोबतीला दो क्षणांचा
कापली बंधने कोणीतरी ती
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा
धावले भोवतीने माझिया ते
कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ?
अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !
ताटवा भोवतीला तो फुलांचा
आडवा देह झाला तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
काळ हा सोबतीला दो क्षणांचा
कापली बंधने कोणीतरी ती
मुक्त आत्माच झाला जोख्नडांचा
धावले भोवतीने माझिया ते
फक्त येती गर्जना काळ्या ढगांतुन
थेंब पाण्याचा मिळे मग आसवांतुन!
'तोडुनी टाकीन साखळदंड सारे'..
चमकतो विश्वास त्याच्या पावलांतुन!
हेच सांगे संसदेतिल गल्बला, की..
माणसे झालीत पैदा माकडांतुन!
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही
पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही
खरेच का पण आपण इतके बोथट झालो
खरेच का आवाज आतवर पोचत नाही
बंद घेतली करून माझी सगळी दारे
मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
वा.न.सरदेसाई हे मराठी गझलेतील खूप जुने जाणते नाव.
ध्वनिफीत रसिकांना ते हे का कुणी फुलांना सांगायला हवे या गझलेद्वारे माहीत झाले. भीमराव पांचाळे यांनी ती गझल गायलेली आहे.
प्रेम व्हाले ओठ माझे चकवुनी
मोरपीशी स्पर्श झाले हरखुनी
नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी
मी विसरले भान माझे हुरळुनी
गझल तिहाई मधील मुशायरा यू ट्यूब वर 'गझल तिहाई' असे शोधून मिळेल. प्रत्येक गझलेचा एक व्हिडिओ केलेला आहे.
वाटतो परमार्थ सध्या स्वार्थही
स्वार्थ वाटो शेवटी परमार्थही
एवढा खोटा कसा वागेल 'तो'....
ही निरर्थकता असावी सार्थही
तू निमित्ताएवढी गझलेमधे
अन निमित्ताएवढा शब्दार्थही
वाटेत दगड माझ्या शेंदूर फासलेले,
झगडून मी जगाशी ईमान राखलेले...
नाही कुणीच येथे शब्दास जागणारे,
जगण्यासही अताशा वेठीस ठेवलेले...
नाहीच न्याय साधा हा कर्ण अर्जुनाला,