नको
पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको
गात्रात शिशिराचा ऋतू
गजरा अता माळू नको
मी मोडल्या शपथा तुझ्या
तूही वचन पाळू नको
ना शक्य काही त्यातले
पत्रे जुनी चाळू नको
मी विझवले आहे मला
तूही जिवा जाळू नको
गझल:
सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने
एकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती !
पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको
गात्रात शिशिराचा ऋतू
गजरा अता माळू नको
मी मोडल्या शपथा तुझ्या
तूही वचन पाळू नको
ना शक्य काही त्यातले
पत्रे जुनी चाळू नको
मी विझवले आहे मला
तूही जिवा जाळू नको
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
बुध, 28/05/2008 - 22:50
Permalink
छान...
छान...
जयंतराव,
आवडली गझल...
मराठी रसिक
बुध, 28/05/2008 - 23:36
Permalink
नैसर्गीक भावना
श्रीयुत जयंतराव,
नैसर्गीकपणे भावना व्यक्त झाल्याने गझल सहज आपलीशी होते.