दुसरा कुणीच नाही....


पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही


गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही


शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही


काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही


डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही


सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही


जयश्री अंबासकर


 


 

गझल: 

प्रतिसाद

व्वा..वा ! सुंदर कल्पना.
हे दोन शेर फार आवडले-
डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही


सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही
शुभेच्छा.

शेर आवडले.........
सरणावरी कळाले उपभोग फार झाला

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही
डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही
सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही        व्वा! सुरेख
सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही          खरेच!
कलोअ चूभूद्याघ्या

जयश्री, ह्या संकेतस्थळावर तुमची गझल वाचून आनंद झाला.

पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाहीसुबोध सुभाषितेच! एकंदर रचना आवडली. पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा.

जयश्री ,
आता गीतांकडून गझलकडे खरा प्रवास सुरू झाला आहे हे जाणवले. अभिनंदन

ज्ञानेश, दशरथ, अजय...... मनापासून धन्यवाद !!
चित्त..... सुरेश भटांसारख्या दिग्गजांच्या साईटवर माझ्या गझलेला स्वीकारलीत्.... खूप आनंद झाला.  अगदी तहे दिल से शुक्रिया !!
वैभवा...... तुझी अशी दाद..... मेरा तो दिन बन गया रे.....!!

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही


सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही
 
वावावाव्वा....